आजारावरील उपचार संपवून अभिनेते ऋषी कपूर नुकतेच भारतात परतले आहेत. पंधरा दिवसंपुर्वी ते भारतात आले आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी शुटिंगला सुरुवात केली आहे. ऋषी कपूर हितेश भाटीया यांच्या अजून नाव न ठरलेल्या सिनेमात झळकणार आहेत.
5 डिसेंबरपासून या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.
याबाबत बोलताना ऋषी कपूर म्हणतात, ‘गुरुवार पासून या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होत आहे. त्यानंतर एक महिन्याच्या दिल्ली येथील शुटिंगच्या शेड्युलला सुरुवात होईल.’ या सिनेमात ऋषी यांच्यासोबत जुही चावला देखील झळकणार आहे. 90च्या दशकातील ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या जोडीने आतापर्यंत ‘बोल राधा बोल’, दरार यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.