By  
on  

पाहा Video : कीर्ती मिटवून टाकेल का जीजी अक्का आणि शुभममधील दुरावा ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता शुभम आणि त्याची जीजी अक्का यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या दुराव्याचं कारण आहे कीर्ती. कीर्तीची शिक्षणाविषयीची आवड आणि ती अभ्यासात किती हुशार आहे हे तिच्या भावामुळे तिने सासरच्या मंडळीपासून लपवलं. मात्र यातच पंधरावीच्या परिक्षेत तिसरी आल्याने कीर्तीचं नाव पेपरात छापून येतं. शेजारी मंडळी हे पाहतात आणि लगेच जीजी अक्कांना पेपर दाखवतात. मात्र जीजी अक्कांचा कीर्तीवर विश्वास असल्याने त्या या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

जेव्हा जीजी अक्कांसमोर सत्य येतं तेव्हा त्या कीर्तीला घरातून काढून टाकण्याचा निर्णय घेतात. मात्र शुभम कीर्तीला थांबवतो. या सगळ्यात आता शुभम आणि जीजी अक्कांच्या नात्याला तडा गेलेला पाहायला मिळालं. मात्र यामुळे शुभमलाही धक्का बसलाय. त्याचं कामातही मन लागत नाही. या सगळ्यात कीर्ती त्याच्या पाठीशी उभी राहते.  दोघांचा दुरावा मिटवून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्याला सांगते. 

तेव्हा शुभम आणि जीजी अक्कांना पुन्हा एकत्र आणण्यात कीर्तीला यश मिळेल का ? काय असेल कीर्तीचं पुढचं पाऊल ? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive