'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. शिर्के-पाटलांच्या कुटुंबाची कहाणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय ठरतायत. गौरी-जयदीप, मल्हार, माई-दादा, आक्का यांच्यासोबतच या मालिकेतल्या शालिनी वहिनींचा खुपच मोठा दरारा पाहायला मिळतो. शालिनी वहिनीच्या दुष्ट कारवायांमुळे ही मालिका पाहायला मजा येते. शालिनी वहिनी हे खलनायिकी पात्र साकारणारी अभिनेत्री माधवी नेमकर ही प्रसिध्दीच्या शिखरावर आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून माधवी सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माधवीने तिच्या घरी नव्या पाहुणीचं स्वागत केलं...अहो, ही पाहुणी दुसरी तिसरी कोणी नसून चक्क तिने नवी-कोरी कार घेतलीय. आपल्या लहान मुलासोबत माधवीने या कारचं दणक्यात स्वागत केलं व ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली.