कोणत्याही कलाकृतीला चाहत्यांकडून मिळणारं भरभरुन प्रेम हीच त्यांच्या कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते.सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय, ही मालिका घराघरांत पोहचलीय. कोल्हापूरच्या शिर्के-पाटलांच्या परिवाराची ही कहाणी तुफान गाजतेय. म्हणूनच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेने नुकताच 200 एपिसोड्सचा पल्ला गाठलाय.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही जयदीप आणि गौरीची हळूवार फुलत जाणारी कहाणी रसिक प्रेक्षकांना खुप भावतेय, तर शालिनी वहिनींच्या दुष्ट कारवायांनी शिर्के-पाटील कुटुंबियांच्या नाके नऊ आणलेत. तर दादा-माईंची माया सर्वांनाच हवीहवीशी वाटेतय. त्यामुळे आता 200 भागानंतरही उत्कंठावर्धक अशी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतील यात शंका नाही.