By  
on  

आई कुठे काय करते : अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वळण, होणार खास व्यक्तीची एन्ट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.

हट्टास पेटून अखेर संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात सून म्हणून दाखल झालीय. यानंतर आप्पांनी अरुंधतीला लेक मानून घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केलाय. अरुंधती आता स्वावलंबी बनलीय स्वत:च्या पायावर ती उभी आहे. आश्रमाच्या ऑफीसात नोकरी करणारी अरुंधती मुलं व आई-आप्पांवर लक्ष ठेवण्यासाठी समोरच गौरीकडे राहिला आलीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दरम्यान, अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं.   सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वांनी तिला यासाठी जबाबदार धरत, फैलावर घेतलं आहे. 

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे.  मालिकेत अरुंधतीच्या एका मित्राची एण्ट्री होणार आहे. अरुंधतीच्या या मित्राची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत आता पर्यंत काही खुलासा झालेला नाही. परंतु ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत असल्याची चर्चा सुरु आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात येणारा हा नवीन मित्र वादळ घेऊन येतो की तिला आधार देतो हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive