तुझ्या माझ्या संसाराला ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक. या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली. एकत्र कुटुंब पध्दतीत वाढलेला कोल्हापूरचा सिध्दार्थ आणि मुंबईतील एकुलती एक असलेली व आई-बाबांचा घटस्फोट झालेली अदिती यांच्या लग्नाची व लग्नानंतरची कहाणी मालिकेत पाहायला मिळते. कोल्हापुरच्या पार्श्वभूमीवरची एकत्र कुटुंबाची गंमत पाहायला प्रेक्षकांना मजा येते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडलीय.
तुझ्या माझ्या संसाराला ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर असतानाच या मालिकेतून एक आश्चर्यकारक बातमी समोर येतेय, ती म्हणजे या मालिकेत मोठ्या बाईंची म्हणजेच सिध्दार्थच्या आईची भूमिका साकारणा-ाया अभिनेत्री अंजली जोशी यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.
गुळपोळी या कोगावातील देशमुख कुटुंबात सून म्हणून आलेल्या एकुलती एक असलेल्या अदितीला सामावून घेण्यासाठी मोठ्या बाई नेहमीच प्रयत्नशील असतात. सासूच्या नाही तर आईच्या मायेने व प्रेमाने त्या तिला घरात नांदवतात. चार समजूतीच्या गोष्टी सांगतात. घरचे संस्कार-चालीरीती शिकवतात. अदितीला घरात कशाचीही कमतरता भासू नये यासाठी मोठ्याबाई नेहमीच पुढे असतात.. तिचं मन जपतात. ही भूमिका साकारणा-या अंजली जोशी अर्थात मोठ्या बाईंनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आता समोर आली आहे. या निर्णयामुळे सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंजली जोशींनी ही मालिका का सोडली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आता मालिकेत मोठ्या बाईंच्या भूमिकेत दुस-या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.