By  
on  

तनुश्री दत्ता प्रकरण: नाना पाटेकर म्हणाले, 'जे दहा वर्षांपूर्वी खरं होतं ते आत्ताही खरंच आहे'

हॉर्न ओके प्लिज 2008 या सिनेमाच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तवणुक केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. आता हा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. बॉलिवूडमध्येसुध्दा या वादाचे अनेक विविध पडसाद उमटताना दिसले. या संपूर्ण प्रकरणावर ब-याच कालावधीने शनिवारी नानांनी एक प्रतिक्रीया दिली होती.

त्यानंतर आज सोमवारी नानांनी जमलेल्या पत्रकारांसमोर फक्त एकच प्रतिक्रिया देत प्रसिध्दी माध्यमांचा निरोप घेतला आहे. ते म्हणाले "तनुश्रीने लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ती खोटं बोलतेय. जे दहा वर्षांपूर्वी खरं होतं ते आत्ताही खरंच आहे. यात काहीच बदल नाही" मला माझ्या वकिलांनी या प्रकरणी काहीगी बोलण्यास मनाई ेकली आहे. नाहीतर मी तुमच्याशी बोललो असतो. मला आवडतो तुमच्याशी संवाद साधायला.

नाना शनिवारी या प्रकरणी म्हणाले होते, जे खोटं आहे ते खोटंच राहील. नानांची फक्त इतकीच प्रतिक्रीया प्रसिध्दी माध्यमांना मिळाली होती. जोधपूरमध्ये अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल-4' सिनेमाच्या शूटींगचं शेड्यूल पूर्ण करुन नाना शनिवारी मुंबईत परतले होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते.

https://twitter.com/ANI/status/1049242987522400256

 

दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात हॉर्न ओके प्लिजचे निर्माते सामी सिध्दीकी यांनी आज एक लेखी तक्रार दाखल केली आहे.तर महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच तनुश्री दत्ताने मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात या सिनेमातील अभिनेता नाना पाटेकर, निर्माते सामी सिध्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधा तक्रार दाखल केली होती. पण आज स्वत:च हॉर्न ओके प्लिजचे निर्माते सामी सिध्दीकी आपली तक्रार घेऊन ओशिवरा पोलिस ठाण्यात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील किशोर गायकवाडसुध्दा होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive