बिग बॉस संपल्यानंतर आता त्याची जागा ‘खतरोंके खिलाडी घेणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल, मे मध्ये या शो चं शुटिंग होणार आहे आणि जुनला हा शो ऑनएअर जाईल. तीन महिने या शोचा कालावधी असणार आहे. हा शो संपल्यानंतर बिग बॉसच्या पुढच्या सीझनची सुरुवात होईल.
या शोचं शुटिंग खरं तर परदेशात होत असते. पण यावेळी करोनाचा प्रादुर्भाव पाहाता एखाद्या सुरक्षित लोकेशनच्या शोधात मेकर्स आहेत. या सीझनलाही रोहीत शेट्टी होस्ट करणार आहे. करोनामुळे हा शो लांबणीवर पडला आहे. या शोमध्ये रुबीना आणि अभिनव दिसणार आहे. याशिवाय अभिनेता मोहित मलिकही या शोमध्ये दिसणार आहे.