By  
on  

सामंथा आणि नागा चैतन्य या कपलने घेतला घटस्फोटाचा निर्णय, चार वर्षांपूर्वी केलं होतं लग्न

मागील काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी सामंथा अक्कीनेनी आणि नागा चैतन्य ही जोडी विभक्त होत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र ही चर्चा खरी ठरलीय. सामंथा आणि नागा या दोघांनी विभक्त होऊन घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

घटस्फोटाच्या या वृत्ताला सोशल मिडीयाच्या माध्यमातून दुजोरा देण्यात आलाय. सामंथा आणि नागा या दोघांचाही सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने त्यांचे चाहते मात्र दुखावले आहेत. शिवाय या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.

 

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघं विभक्त होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. नागा चैतन्य याने सोशल मिडीयावर लिहीलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलय की, "खूप विचारविनिमय केल्यानंतर  सॅम आणि मी पति - पत्नी म्हणून वेगळे होत आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नातं ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि पुढे जाण्यासाठी आमचं खासगी आयुष्य तसच असू द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार."

सामंथा आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी बराच एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. दोघांनी थाटात ग्रँड पद्धतिने लग्न केलं होतं.दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक आयडल कपल म्हणून त्यांची ओळख होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी बऱ्याच चर्चा सुरु होऊ लागल्या होत्या.

 

Recommended

PeepingMoon Exclusive