बॉलिवूडमध्ये अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या फॅण्टम फिल्मसने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण आता चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे ती, म्हणजे फॅण्टम फिल्म्स बंद होण्याची. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मंटेना या चौघांनी मिळून फॅण्टम फिल्मसची स्थापना केली होती. या चौघांच्या दोस्ती-यारीचे अनेक दाखले बॉलिवूडमध्ये दिले जायचे. पण अचानक एक वक्तव्य करत त्यांनी फॅण्टम फिल्म्स बंद केल्याची घोषणा केली.
दिग्दर्शक अनुराग कश्यपने अचानक एक ट्विट करत आपण वेगळे होत असल्याची माहिती सर्वांना दिली आणि आपल्या तिघा मित्रांसोबत काम करुन मजा आली व पुढील वाटचालीसाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा असं म्हटलंय. प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं आणि संपून जातं. तसंच हेही होतं. आम्ही पूर्ण प्रयत्न केला. आम्ही यशस्वी झालो आणि अयशस्वीसुध्दा. महत्त्वाचं म्हणजे अशाचप्रकारचे ट्विट मधु मंटोना आणि विक्रमादित्य मोटवाने यांनीसुध्दा केले आहेत.
https://twitter.com/anuragkashyap72/status/1048301339971936256
चाहते मात्र या फॅण्टम फिल्मस बंद झाल्याच्या बातमीमुळे प्रचंड नाराज झाले आहेत.
https://twitter.com/VikramMotwane/status/1048303234308177920