बॉलिवूडमध्ये नेहमीच सोज्वळ आणि संस्कारी भूमिका साकारणारे प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर एका टीव्ही निर्मातीने बलात्काराचा आरोप लावला आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. सध्या सुरु असलेल्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरणामुळे जणू ही 'मी टू' चळवळच बॉलिवूडमध्ये उभी राहिली असून महिला कलाकार आता आपल्यावरील अन्यायाविरूध्द आवाज उठवू पाहत असल्याचे दिसून येतेय.
प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विंटा नंदा यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावत या संपूर्ण प्रकाराचा लेखी वृत्तांतच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.
विंटाने लिहलं आहे, “आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.
विंटा पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबर त्यांनी एका पार्टीत ड्रिंकमध्ये काही मिसळून माझ्यावर बलात्कार केला.
https://www.facebook.com/vintananda/posts/10156499299095560
दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलोखनाथ यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले असून वेळ आल्यावर योग्य ते समोर येईलच, असं म्हणत सध्या मौन बाळगलं आहे.