By  
on  

Exclusive कोणाच्या लिहण्यामुळे मला दोषी ठरवू नका: आलोक नाथ

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांच्यावर प्रसिध्द लेखिका आणि निर्मात्या विनीटा नंदा हिने आज फेसबुक पोस्टद्वारे बलात्काराचे आरोप लावले. या बातमीने संपूर्ण एकच खळबळ उडाली.

प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विंटा नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावत या संपूर्ण प्रकाराचा लेखी वृत्तांतच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे. या नवीन प्रकरणामुळे अनेक उलट-सुलट चर्चांन उधाण आलं. पण नुकतंच याप्रकरणी आलोकनाथ यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बलात्काराच्या आरोप फेटाळून लावत पिपींगमूनसोबत खास बातचित करताना आलोकनाथ म्हणाले, “ ज्यांच्याकडे कुठलंही काम नाही ते लोकंच अशाप्रकारच्या गोष्टी सांगतात. जर कोणाबरोबर अशी काही घटना घडली असेल तर तेव्हासुध्दा पोलिस होते. कायदा होता, आज 20 वर्षानंतर हा आरोप का? ज्यांना जे बोलायचंय ते बोलू दे. मी निरपराध आहे, हे मला माहितीय आणि माझ्या कुटुंबालासुध्दा. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. मी सध्या याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेतोय. कोणाच्या लिहीण्यामुळे मला दोषी ठरवू नका. माझ्या बोलण्यानेसुध्दा मला निर्दोष माना."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive