सध्या बॉलिवूडमध्ये मी टू मोहिमेने इतका जोर घेतला आहे की अनेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत तर दुसरीकडे त्यांवर अनेक कलाकारांच्या प्रतिक्रीया उमटताना दिसून येत आहेत. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनीसुध्दा नुकतंच मी टू मोहिमेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
अनिल कपूर म्हणतात, “माझ्या घरात तीन महिला आहेत.पत्नी सुनिता आणि दोन मुली- सोनम, रेहा कपूर आणि या तिघीही स्वतंत्र आहेत. मी नेहमी त्यांचं म्हणणं ऐकतो आणि जगानेही महिलांचं म्हणणं ऐकायला हवं,' असं मला वाटतं.'माझ्या मते महिला, मुली या समान नाहीत तर प्रत्येक बाबतीत पुरुषापेक्षा सुपिरिअर आहेत. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर जे काही सुरु आहे ते मस्तच सुरु आहे
https://twitter.com/ANI/status/1050340876273295360
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये जणू काही मी टू मोहिमेचं वादळच घोंघावू लागलं. काहीचं मत आहे की, सिनेसृष्टीत असे प्रकार जाणीवपूर्वक दाबून टाकले जातात. याविरुध्द आवाज उठवणं गरजेचं आहे. तर काही म्हणतात याप्रकरणी तनुश्रीने सबळ पुरावे सादर करावेत, त्यानंतरच निष्कर्ष काढला जाऊ शकतो.