बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी नोंव्हेंबरमध्ये इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी शानदार पध्दतीने लग्नगाठ बांधली. दोघंही आता विवाहीत असल्यानं आपलं सुखी विवाहीत जीवन छान एन्जॉय करतायत. ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यातसुध्दा दोघं आवर्जून उपस्थित होते. सर्वत्र एकत्र उपस्थिती लावताना दिसतात. तसंच पती रणवीरच्या आगामी सिंबा सिनेमाबाबच दीपिका खुपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
दीपिका आणि रणवीरच्या वैवाहीक जीवनाबद्दल अनेक प्रश्न सध्या सामान्य आणि चाहत्यांना भेडसावतायत. त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दोघांचं फॅमिली प्लॅनिंग. त्यांना कधी मूल होणार याची चिंता व कुतुहूल सर्वांना आहे. गुरुवारी एका शिखर संमेलनात रणवीरचा सहभाग होता. यावेळेस रणवीरला फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रश्न केला असता, तो म्हणाला," हा माझ्या एकट्याचा निर्णय नसून दीपिकाचा विचार यासाठी सर्वप्रथम महत्त्वाचा आहे. ती निर्णय घेण्यात खुप उत्तम आहे. तसंच माझ्यापेक्षा जास्त वैचारिक निर्णय ती घेऊ शकते याची मला खात्री आहे. त्यामुळे मुलांसारखा आयुष्याला कलाटणी घेणारा निर्णय दीपिकाच घेईल."