By  
on  

या कारणासाठी रणवीर सिंह पुन्हा साकारणार नाही अल्लाउद्दीन खिलजी

रणवीर सिंह हा बॉलिवूडचा एनर्जी मॅन सध्या आणखीनच जोशात आहे. त्याचा आगामी सिनेमा गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वांनाच त्याची उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी आपल्याला 'पदमावत' सिनेमातील त्याने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिलजीची आवर्जून आठवण येते. 'पदमावत' या ब्लॉकब्लस्टर सिनेमात ही नकारात्मक पण जोशपूर्ण भूमिका साकारत त्याने आपल्या अभिनयाची आणखी एक छटा इंडस्ट्रीला दाखवून दिली. या भूमिकेसाठी त्याचं प्रेक्षक समिक्षकांनी तर प्रचंड कौतुक केलंच पण त्याला सर्वोत्कृष्ट म्हणून अनेक पुरस्कार मिळवून दिले.

'पदमावत' सिनेमातील ही भूमिका जगण्यासाठी रणवीरने कठोर मेहनत घेतली होती. त्यावेळी एका मुलाखती दरम्यान त्याने हे सुध्दा स्पष्ट केलं होतं. या भूमिकेची पूर्व तयारी म्हणून त्याने आपल्या गोरेगाव येथील घरी 21 दिवस स्वत:ला कोंडून घेतलं होतं आणि संपूर्ण जगापासून अलिप्त अंधा-या जागी राहिला होता. याचा फायदा त्याला खिलजी साकारताना झाला. राणी पदमावतीसाठी वेडापिसा झालेला आणि नशेत धुंद असलेला तो खलनायक त्याने हुबेहूब वठवला. हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहणंसुध्दा पर्वणीच ठरते.

गली बॉय निमित्ताने रणवीरला जेव्हा तु पुन्हा कधी खिलजी साकारशील का असा प्रश्न करण्यात आला तेव्हा तो उत्तरला, "नाही. आता बिलकुल नाही. मी पुन्हा त्या झोनमध्ये जाऊ इच्छित नाही. सध्या मी आनंदी विवाहीत जीवन एन्जॉय करतोय. त्यामुळे मला त्या छटेची भूमिका पुन्हा करण्याची अजिबात इच्छा नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive