By  
on  

‘नक्की काय घडलं जेव्हा सोनाली बेंद्रेला कॅन्सरचं निदान झालं, असा होता अनुभव

सोनाली बेंद्रेला जेव्हा हायग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्याचवेळी सगळ्या बॉलिवूडसाठीच तो एक मोठा धक्का होता. सोनालीच्या कुटुंबियांवरही या आजारपणाचा खुप मोठा परिणाम झाला. सोनालीला १३ वर्षाच्या रणवीरला भारतात सोडून उपचारासाठी परदेशात जावं लागलं. पण सोनालीच्या कॅन्सरशी संपूर्ण लढ्यात रणवीरची तिला खंबीर साथ मिळाली.

https://www.instagram.com/p/BprW3dfHPdr/?utm_source=ig_web_copy_link

याबाबत सोनाली म्हणते, माझं निदान झालं तेव्हा रणवीर शाळेतील ट्रीपला गेला होता. खरंतर मला त्यावेळी सगळ्यात जास्त त्याची गरज होती. मला त्याच क्षणाला त्याला सगळं सांगायचं होतं. सगळ्यांचं मत होतं त्याने ट्रीपवरून परत आल्यावर मी हे सगळं त्याला सांगावं पण मी कुणाचंच ऐकलं नाही. त्याला बोलावून घेतलं.

https://www.instagram.com/p/BuTFHn2h4bw/?utm_source=ig_web_copy_link

रणवीर अत्यंत संवेदनशील मुलगा आहे. त्याला स्वत:ला अस्थमा आहे. पण तरीही त्याने तो अगदी खेळकरपणे घेतला आहे. त्याच्या या धीराचा मला माझ्या आजारपणात खुप फायदा झाला. खरं तर मी या आजारपणातून वाचेन असं वाटत नव्हतं. उपचारादरम्यान सर्जरी करावी लागणार हे समजल्यावरदेखील मी खुप निराश झाले होते. त्यावेळी माझी बहिण आणि गोल्डीने दिलेला आधार खुप महत्त्वाचा होता. सुदैवाने माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मी पुढील आयुष्य पाहू शकले. हा काळ जितका वेदनादायी होता तितकाच मला नवा दृष्टीकोन देणारा होता.

Recommended

PeepingMoon Exclusive