महिनाभरापुर्वी रंगलेल्या निवडणूक संग्रामाचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडकरही नशीब आजमावताना दिसले. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती.
मतमोजणीमधील पहिल्या काही कलांमध्ये उर्मिला पिछाडीवर पडत गेली. त्यानंतर मात्र पुढील काही कलांमध्ये गोपाल शेट्टी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. राजकारणात पदार्पणातच पराभव स्विकारावा लागल्यावर उर्मिलाने माध्यमानांही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते,’ मी आताच या विषयावर काही बोलणं चुकिचं ठरेल. नक्की काय काय घडलं आहे याचा अंदाज मी घेत आहे. गोपाळ शेट्टींच्या विधानावर व्यक्त होणं मला योग्य वाटत नाही. सध्याची वेळ त्यासाठी योग्य नाही. त्यांना विजयानिमित्त खुप शुभेच्छा. हा पराभव स्विकारते आणि खुप खिलाडू वृत्तीने याकडे पाहाते’. उर्मिलाने काही दिवसांपुर्वीच राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.