By  
on  

‘भारत’च्या कमाईची घोडदौड तिस-या दिवशीही सुरुच

ईददिवशी रिलीज झालेला सलमानचा सिनेमा हिट असणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. सलमान-कतरिनाचा ‘भारत’ बॉक्स ऑफिसवर जादू करण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजदिवशीही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता. दुस-या दिवशी या सिनेमाचं कलेक्शन ७० कोटींपर्यंत पोहोचलं होतं. तिस-यादिवशी या सिनेमाने २२.२० कोटींचा व्यवसाय केला होता. आतापर्यंत या सिनेमाने ९५.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. आता चौथ्या दिवसापर्यंत हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल यात शंका नाही.


 

यासोबतच भारतचा समावेश मोठी ओपनिंग असलेल्या तीन सिनेमांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या सिनेमाला वीकेंडच्या सुट्टीचा फायदा मिळेल यात शंका नाही. भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी यांच्या देखील महत्त्वपुर्ण भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive