बॉलिवूडचे प्रसिध्द पार्श्वगायक उदित नारायण यांच्या गाण्यांची जादू आजही रसिकांवर कायम आहे. उदित नारायण हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उदितजी यांना बिहारमधील एका अनामिक व्यक्तीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी या प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमधील हा व्यक्ती मागील एक महिन्यांपासून उदितजींना फोन करुन सतावतो आहे, परंतु विचार करण्यासारकी बाब म्हणजे त्याने आत्तापर्यंत पैशाची कोणतीच मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. पोलिसांनी हा नंबर ट्रॅक रेकॉर्डवर टाकल्यानंतर या फोनचं लोकेशन बिहार असल्याचं निदर्शनास आलं. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांची टीम या प्रकरणी संपूर्ण तपास करण्यासाठी बिहारला रवाना होणार असल्याचे समजते.