अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या बहारदार अभिनयाने सजलेला आणि 90च्या दशकांत धुमाकूळ घातलेल्या मि. इंडीया सिनेमा आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. जबरदस्त गाणी, धम्माल डॉयलॉग्स आणि जबरदस्त अॅक्सन सीन्सने रसिकांना मोहिनी घातली. आता या सिनेमाच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे.
अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या सिक्वलची चर्चा सुरु होती. पण या सिनेमाचे निर्माते बोनी कपूर यांनी सिनेमाच्या सिक्वलबाबत मौन धारण केले होते. पण आता 'भारत'फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर हा सुपरडुपरहीट सिनेमाची नवी सिरीज घेऊन रसिकांसमोर येतोय. खुद्द त्यानेच ट्विट करुन ही खुशखबर दिली आहे.
अली अब्बास जफर ट्विटमध्ये म्हणतो, "मि. इंडीयातील रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा घेऊन सिनेमा करण्याची माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. यासाठी झी स्टुडीओजचे सहकार्य मला लाभलं आहे. अजूनही सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. ती पूर्ण झाली की कलाकारांबाबत शिक्कामोर्तब करण्यात येईल."
Thank you everyone for lovely birthday wishes ️️️.
— ali abbas zafar (@aliabbaszafar) January 18, 2020
आता हा सिनेमा कधी येणार, जुन्याच कथेत नवा ट्विस्ट येणार का, अनिल कपूर-श्रीदेवी आणि मॉगॅम्बोची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण अद्याप तरी या सर्वांचा उलगडा झाला नाहीए, त्यामुळे सविस्तर माहिती हाती लागेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल.