आज संपूर्ण जगावर करोना विषाणूने दहशत माजवली आहे. आपल्या भारतातसुध्दा तो चांगलाच हातपाय पसरु लागलाय. त्यामुळे तो त्याची दहशत आणखी वाढवण्यापूर्वी वेळीच त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळले आहेत, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने नुकतंच सर्व बॉलिवूड कलाकारांचा एकत्रित एक व्हिडीओ जनहितार्थ जारी केला आहे.
या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आलिया भट, रणवीर सिंह, अर्जून कपूर, वरुण धवन, शिल्पा शेट्टी आदी सर्वच कलाकार हा कसोटीचा काळ असून जबाबदारीने वागण्याचं आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन नागरिकांना करताना पाहायला मिळतायत.
Let us all come together & win this #WarAgainstVirus
Thank you @RSPicturez & all the artists for this pic.twitter.com/oqBKZm7TcZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2020
लाडक्या कलाकारांनी सांगित्यल्यावर कोण ऐकणार नाही, उलट प्रत्येक जण सध्या आवश्यक असलेल्या या बाबींचं त्यांनी सांगितल्यामुळे काटेकोर पालन करतील यात शंका नाही... काय मग, तुम्ही करणार ना?