अजय देवगण आगामी सिनेमात राजनितीतज्ञ चाणक्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 2018मध्येच या सिनेमाची घोषणा केली गेली होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवातही होणार होती. पण करोनाच्या प्रकोपामुळे या सिनेमाचं शुटिंग पुढे गेलं आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी नुकतंच या सिनेमाला झालेल्या उशीरामागचं कारण स्पष्ट केलं.
एका न्युज एजन्सीशी बोलताना नीरज म्हणतात, ‘ खरं पाहता टीमसोबत मिटींग करता येणं अशक्य आहे. पण फोन आणि मेलच्या सहायाने टीम संपर्कात आहे. सगळ्या डिपार्टमेंटचे हेड, वीएफएक्स, कॉस्च्युम, आर्ट आणि प्रॉडक्शन डिझाईन सगळ्यांसोबत सतत संपर्कात आहे. अजून खुप काम बाकी आहे. नीरज म्हणतो, ‘चाणक्य’ च्या शुटिंगवरही करोनाचा प्रभाव आहे हे इतक्या लगेच सांगता येणार नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर कधी शुटिंग सुरु होईल याचं प्लॅनिंग करावं लागेल. अजयच्या निवडीबाबत नीरज म्हणतो, ‘ अजय या सिनेमासाठी सर्वोत्तम निवड आहे. माझं हे म्हणणं तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर नक्कीच पटेल यात शंका नाही.’