By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधतीने अनिरुद्धला दिला हा सल्ला

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर असल्याचं पाहायला मिळतय. अनिरुद्धच्या अपघातानंतर हळूहळू परिस्थिती बदलेली पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचे संवाद होऊ लागले आहेत. अनिरुद्धच्या अपघातानंतर अरुंधती त्याची काळजी घेताना दिसत आहे. संजना सोबत राहणारा अनिरुद्ध अपघातानंतर आता पुन्हा त्याच्या घरी राहतोय.

दोघांमध्ये नुकत्याच झालेल्या संभाषणात दोघं एकमेकांसोबत आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलताना दिसले. यावेळी अरुंधती म्हणते की, "आयुष्य संपवायचं नाही, ते स्विकारायचं आणि जगायचं." यावेळी अनिरुद्ध आयुष्यात मिळणारं यश आणि त्यानंतर झालेला बदल याविषयी अरुंधतीशी बोलतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

जवळपास संपत आलेलं दोघांचं हे नातं आता कुठेतरी पुन्हा रुळावर येत असल्याचं पाहायला मिळतय. तेव्हा अरुंधती आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र होणार का ? काय असेल त्यांचं पुढचं पाऊल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive