By miss moon | 01-Jun-2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत समरचं खरं रुप येणार समोर, समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे ?

पाहिले न मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी या कलाकारांच्या पात्रासह मालिकेतील एक पात्र लक्षवेधी ठरतय. ही व्यक्तिरेखा म्हणजे समर प्रताप जहागीरदारची......

Read More

By miss moon | 24-May-2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा घेतला ध्यास

घरच्यांच्या विराधोनंतरही अनिकेत आणि मनूचा सुखी संसार सुरु आहे. प्रेमाखातर दोघांनी घरच्यांपासून लपून लग्न केलं, आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता.....

Read More

By Ms Moon | 24-May-2021

उचलले न मी तुला, पाहा अनिकेत-मनूचा धम्माल व्हिडीओ

प्रेमाखातर अनिकेत आणि मनूने घरच्यांपासून लपवून लग्न केलं आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर.....

Read More

By miss moon | 22-Apr-2021

या वाहिनीने घेतला अविरत मनोरंजनाचा वसा, मालिकांच्या शूटिंगला सुरुवात

 सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजनात खंड पडू नये आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहता यावे यासाठी झी मराठी वाहिनीने देखील अविरत मनोरंजनाचा वसा घेतला आहे. प्रेक्षकांसोबतचे हे ऋणानुबंध.....

Read More

By miss moon | 13-Mar-2021

मानसी-अनिकेतचं झालं लग्न, काय असेल समरची पुढची चाल ?

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी सोबत प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे. ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते.

मनुचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा सपाटा लावतात..समर मनूच्या आई वडिलांवर स्वतःची छाप टाकण्यासाठी तिचं लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतो. मनुला हा धक्का सहन होत नाही, जर समरने कोणी मुलगा समोर उभा केला तर आई वडील लगेच तयार होतील, अशी तिला खात्री होते. मनू अनिकेतला सांगते की "आता आपल्यासमोर काही पर्याय उरला नाहीये, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचार ही मी करू शकत नाही", अखेर नाईलाजाने मनू अनिकेत घरच्यांना अंधारात ठेवून लग्न करतात. त्यांच्या ह्या प्रेमाच्या नात्याला नवी ओळख मिळाल्याने दोघेही प्रचंड आनंदी आहेत. पण घरच्यांपासून हे सत्य लपवण त्यांना पटत नाही. दोघे मिळणं धीर एकवटून घरी त्यांचं लग्न झालं हे सांगायचं ठरवतात. 

परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. देसाईंच्या घरावर अनाहूतपणे संकट कोसळत. त्यामुळे राजन देसाईंची तब्येत बिघडते, घरचं वातावरण डळमळीत होतं. ह्या प्रकाराने मनुचा धीर खचतो. अनिकेत सांगतो, जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपण लग्नाविषयी कोणाला काही सांगायचं नाही. पण समर च्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो देसाई घरावर आणि मनुवर आलेल्या ह्या कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागतो. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे या मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.

.....

Read More