By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' मालिका निर्णायक वळणावर, सोहम मनापासून मागणार आईची माफी

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत सध्या आई-मुलाचा दुरावा पाहायला मिळतोय. आसावरी तिच्या बबड्यापासून दूर गेलीये. पण या सगळ्यात आसावरी आणि अभिजितने त्यांचा वेगळा संसार थाटला आहे. अभिजितने सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने केल्यानंतर ते वेगळे राहत आहेत. यातच शुभ्रा ही त्यांना सोहमच्या नकळत मदत करताना दिसते. पण आता ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे. 

मात्र या मालिकेत ज्या क्षणाची प्रेक्षक वाट पाहत होते तो क्षण आता लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण दुरावलेल्या आई मुलाची पुन्हा भेट होणार आहे. सोहम म्हणजेच बबड्या आता सुधारणार आहे. एका कुकिंग स्पर्धेनंतर आसावरी ने केलेलं भाषण एकून सोहम भावुक होतो. त्याला भरुन येतं आणि त्याचे डोळे पाणावतात.

यात कुठेतरी चुकलो याची जाणीव त्याला होता आणि बबड्या मनापासून आईची माफी मागतो.

पण आता बबड्यावर चिडलेली आसावरी त्याला माफ करेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का ? आणि त्यानंतर अभिजित - आसावरी परत आपल्या घरी जाणार का हे लवकरच मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive