By  
on  

पुन्हा त्याच जोशात 'कारभारी लयभारी' प्रेक्षकांच्या भेटीला

'कारभारी लयभारी' या मालिकेच्या वेगळ्या संकल्पनेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेत अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण या कलाकारांची फ्रेश जोडी पाहायला मिळाली. तेजपाल वाघ यांची कथा, विशाल कदम यांचं संवाद लेखन, स्वप्निल गांगुर्डे यांची पटकथा असलेली ही मालिका लक्षवेधी ठरली. 

सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. म्हणूनच या काळाच चित्रीकरणावरही निर्बंध आणले आहेत. या कारणामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. मात्र या परिस्थितीत कारभारी लयभारी या मालिकेने मात्र थोडा विराम घेतला होता. मात्र आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. पुन्हा त्याच जोशात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मालिकेत अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिऴवून द्यायचा, राजवीर चे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात आणि राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी प्रियांका विशेष प्रयत्न करताना दिसणार आहे. पण सक्रिय राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना? हे या मालिकेच्या नव्या भागात पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी पाहणं रंजक ठरेल एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive