By  
on  

'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजू करणार अपर्णाची घरातून हकालपट्टी

 राजा रानीची गं जोडी या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळतय. या मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. बर्‍याच महिन्यापासून ढाले पाटीलांच्या घरामध्ये अपर्णाने संजू – रणजीतच्या विरोधात कट कारस्थानं करून सगळ्यांची मनं जिंकली होती. अपर्णाचा खरा स्वभाव कसा आहे आणि तिला नक्की काय हवं आहे हे सुजीतच्या आधीच लक्षात आलं होतं. विश्वासात घेऊन त्याने ते संजूला देखील सांगितले होते. संजूने सुजितला दिलेले वचनही पाळले.

सुजितला अपर्णासोबतच्या जबरदस्तीच्या नात्यातून संजू कायमचे सोडवणार आहे. आणि आता लवकरच अपर्णाचा पर्दाफाश होणार आहे. आजवर अपर्णाने जे काही खोटं सांगितले, खोटं वागली आहे ते आता संजू सगळ्यांच्या समोर आणणार आहे.

अपर्णाचं सत्य समोर आणणल्यानंतर संजू ही अपर्णाची ढालेपाटलांच्या घरातून हकालपट्टी करणार आहे. हे देखील संकट राजा – रानीने मिळून दूर केलं.  

ढालेपाटीलांच्या घरामध्ये श्रावणातील पूजा ठेवण्यात येणार आहे. त्या पूजेमध्ये अपर्णा आणि सुजीतने बसावे अशी कुसुमावती यांची इच्छा आहे. संजू आणि रणजीत मिळून अपर्णाचं सत्य ढालेपाटील कुटुंबासमोर आणणार आहेत. पूजेच्याचं दिवशी संजू सगळ्यांना सांगणार की, अपर्णा कधी गरोदर नव्हती तिने बाळ पडण्याच नाटक केलं. हे कळल्यानंतर आईसाहेबांना आणि घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो.

ढालेपाटीलांच्या घरातून अपर्णाची हकालपटी झाल्यानंतर कुसुमावती आणि संजूचं नातं सुधारेल का ?  पुढे मालिकेमध्ये काय घडणार आहे हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive