By  
on  

'मन उडु उडु झालं' मालिकेच्या नवरात्री सीन शूटींगसाठी लागले तब्बल 35 तास

'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रचंड गाजतेय आणि त्याचसोबत त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय.सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. या सणाचा उत्साह 'मन उडु उडु झालं' या मालिकेतही पाहायला मिळतोय.  या मालिकेत देखील प्रेक्षकांना नवरात्रीची धूम पाहायला मिळतेय.

 प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि दिपू अनवाणी नवरात्री साजरी करतेय आणि त्यासोबतच ती उपवास देखील करतेय. पण गरबा आणि दांडिया शिवाय नवरात्री अपूर्ण आहे. या मालिकेत सध्या प्रेक्षकांना दिपू आणि इंद्राचा गरबा आणि दांडिया देखील पाहायला मिळणार आहे. हा नवरात्री सिक्वेन्स शूट करण्यासाठी संपूर्ण टीमला चक्क 35 तास लागलेत.

या सिक्वेन्सच्या शूटिंगच्या सगळ्या गोष्टी एका बीहाईंड द सिन व्हिडिओमध्ये कैद करून ऋताने तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना ऋता म्हणाली की, "35तासांच्या शूटिंगची मेहनत ही अशी दिसते. पण शेवटी जेव्हा संपूर्ण सिक्वेन्स व्यवस्थित आणि छान शूट होतो तेव्हा आपण सगळा थकवा विसरून जातो. या सगळ्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. मला अभिमान आहे कि मी मन उडु उडु झालं या कार्यक्रमाचा हिस्सा आहे. प्रेक्षकांनी अगदी कमी वेळात आम्हाला स्वीकारलं आणि आमच्यावर खूप प्रेम केलं आणि पुढेही करत राहतील. प्रेक्षक हा नवरात्री विशेष भाग नक्की एन्जॉय करतील याची मला खात्री आहे."

हृताने संपूर्ण टीमचे आभार मानत कृतज्ञता देखील व्यक्त केलीय. मालिकेप्रमाणेच या व्हिडिओला देखील चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद देत आहेत.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive