By  
on  

'मन उडू उडू झालं' मालिकेत येणार हा मोठा ट्विस्ट

'मन उडू उडू झालं' या मालिकेतून दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर असताना मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. 

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि इंद्राने आपल्या मनातील भावना दिपूसमोर व्यक्त केल्या आणि दिपूने इंद्राच्या भावनांचा स्वीकार देखील केला. पण दिपूने अजून तिच्या मनातील इंद्राबद्दलच प्रेम इंद्रा समोर व्यक्त केलं नाहीये. तर दुसरीकडे कार्तिक हा देशपांडे सरांकडे सानिकाचा हात मागण्यासाठी भेटायला येतो पण देशपांडे सर त्याची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि घरातून हाकलून देतात. त्यामुळे सानिका दुखावते आणि दु:खी होते.

 सानिकाचं हे वागणं पाहून बाबा खूप काळजीत आहेत. अशातच ते सानिकासाठी साळगावकरचं स्थळ म्हणून विचार करतात. साळगावकर हाच इंद्रा आहे याची कल्पना देशपांडे सरांना नाही. त्यामुळे दिपूवर प्रेम असलेल्या इंद्राचं स्थळ सानिकासाठी सुचवल्यावर काय गोंधळ होणार हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळे.

Recommended

PeepingMoon Exclusive