By  
on  

'जुळता जुळता जुळतंय की' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

'सोनी मराठी' वाहिनीने त्यांच्या मालिकांमधून नेहमीच वेगळा विषय देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच एक वेगळा विषय आणि नवीन प्रेमकथा ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतून मांडण्यात आली. 

प्रेमाला जसे वयाचे बंधन नसते त्याचप्रमाणे उंची, रुप, आर्थिक, सामाजिक परिस्थिती यावरुनही एकमेकांना तोलू नये हा एक महत्त्वाचा संदेश या मालिकेतून अधोरेखित करण्यात आला. ‘जुळता जुळता जुळतंय की’ची जोडी अपूर्वा आणि विजय यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर तयार केले आहे. या दोघांसह संपूर्ण कुटुंब प्रेक्षकांना आपल्यापैकी एकच वाटायचं आणि हेच खरे कौतुक आहे.

योग्य कथा योग्य वेळेत संपवून, प्रेक्षक वर्गांचे प्रेम, आशिर्वाद घेऊन ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग २२ जूनला शनिवारी होणार आहे. मालिकेचा निरोप घ्यावा लागत असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे आवडते कलाकार पुन्हा दिसणार नाही याची खंत नक्कीच असणार.

पण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'सोनी मराठी' याच वेळेत घेऊन येत आहे नवीन मालिका. संग्राम साळवी आणि अमृता देशमुखची या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेली ‘मी तुझीच रे’ ही मालिका २४ जून पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता 'सोनी मराठी' वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive