बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच आपला वक्तशीरपणा आणि शिस्तबध्द काम आणि शूटींगच्या वेळा पाळण्यासाठी खुप प्रसिध्द आहे. त्याच्या नियोजनबध्द कामाचे दाखले इंडस्ट्रीत नेहमीच दिले जातात. पण अक्षयच्या 28 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत त्याने प्रथमच आजचं त्याचं नियोजित शूटींग रद्द केलं आहे. आश्चर्य वाटत असलं तरी ही बाब खरी आहे.
आज मुंबईतील ‘हाऊसफुल 4’चं शूटींग शेड्यूल अक्षयने रद्द केलं आहे. यामागचं कारण म्हणजे, दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर सध्या सुरु असलेले लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप आहेत. यामुळेच अक्षय कुमारने मी टू चळवळीला पाठींबा दर्शविण्यासाठी आजचं शूटींग रद्द् करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचं म्हणजे निर्माते साजिद नाडियदवाला यांनी हा ‘हाऊसफुल 4’च्या मुंबईतील आजच्या शुटींगसाठी तब्बल १४ कोटींचा सेट लावला आहे. पण आता अक्षयच्या या निर्णयामुळे सिनेमाच्या भवितव्याबद्दल प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/1050638043432988672
नाना पाटेकर आणि साजिद खान हे दोघंही साजिदचे खुप चांगले मित्र आहेत पण प्रोफेशनली अक्षय कुमार अशा गोष्टींना खतपाणी घालू शकत नाही, म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला असावा असं बोललं जात आहे.
दरम्यान अक्षयची पत्नी अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिने एक ट्विट करत या संपूर्ण प्रकरणी हाऊसफुलच्या टीमने एक योग्य पाऊल उचलावे असे सुचवले आहे.
https://twitter.com/mrsfunnybones/status/1050631330764009474