By  
on  

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशीचा आधार बनला अर्जुन कपूर

श्रीदेवी ही आपल्या वडिलांची दुसरी पत्नी आहे म्हणून अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच तिचा तिरस्कार करायचा. पण श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनानंतर  संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अर्जुनने वडिलांना व आपल्या सावत्र बहिणी जान्हवी-खुशी यांना या प्रसंगात कशी साथ दिली हे सांगताना, कॉफी विथ करणच्या चॅट शोमध्ये त्याला भावना आवरणं कठिण झालं होतं.

करण जोहरशी बोलताना अर्जुनने सांगितलं, “तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही. श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त येऊन धडकलं आणि क्षणार्धात सर्वच गोष्टी बदलून गेल्या. मी यातून गेलोय त्या वेदना मी समजू शकतो. मी कधीच माझ्या सर्वात मोठ्या शत्रूवर सुध्दा अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना करेन, मी आणि बहिण अंशुलाने जान्हवी व खुशीला शक्य तितकी मदत करुन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.”

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने जान्हवी आणि खुशी या दोघी बहिणींची आणि वडील बोनी कपूर यांचीही खूप काळजी घेतल्याचं आपण सर्वांनीच पाहिलंय. वडिलांसोबत दुबईत जाऊन तिथल्या कायदेशीर बाबी पूर्ण करणं आणि संपूर्ण कुटुंबाच्या पाठी उभं राहून जबाबदारीचं भान राखणं अर्जुनने लिलया पार पडलं.

Recommended

PeepingMoon Exclusive