करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरुय. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी जोड्या हजेरी लावतात आणि आपल्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील किस्से शेअर करतात. पण आता या शोमध्ये जान्हवी कपूरला मदत न केल्यामुळे अर्जुनची बहिण अंशुलाला धमक्या आल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या अर्जुनने ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये उपस्थित राहणा-या प्रत्येक सेलिब्रिटीला एक टास्क दिला जातो. ज्यामध्ये त्या सेलिब्रिटींनी दुसऱ्या सेलिब्रिटींना फोन करून ‘हाय करण इट्स मी,’ असं बोलण्यास सांगावं लागलं. जो सर्वांत आधी फोन उचलून करणला ‘हाय’ बोलतो, तो या टास्कमध्ये जिंकतो. जान्हवीने या टास्कदरम्यान सावत्र बहीण अंशुलाला फोन लावला होता. अंशुलाने तिचा फोन उचलला खरा पण गोंधळामुळे तिला काय बोलावं हेच समजलं नाही. त्यामुळे जान्हवी या टास्कमध्ये हरली. पण यावरून सोशल मीडियावर अंशुलावर जोरदार टीका होऊ लागली. जान्हवीची मदत न केल्याने तिला धमक्याही येऊ लागल्या.
आपल्या बहिणींच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणाऱ्या अर्जुनने मात्र या टीकाकारांना चोख उत्तर दिलं. ‘कॉफी विथ करणमध्ये जे घडलं त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटलं होतं. पण आता मी माझ्या भाषेवर आणखी संयम ठेवू शकत नाही. तुमच्या आई किंवा बहिणीवर अशी वेळ येऊ नये हेच मी इच्छितो.
https://twitter.com/arjunk26/status/1067467916767969280
अर्जुन आणि अंशुला हे बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलं आहेत तर जान्हवी व खुशी कपूर या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या्ंच्या मुली आहेत.