बॉलिवूड भाईजान सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'भारत' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. चौहौबाजूंनी सलमान आणि 'भारत'च्या संपूर्ण टीमवर कौतुकांचा वर्षाव होताना पहिला मिळतोय. अशातच या सिनेमाच्या भरघोस यशानिमित्त एका मुलाखतीदरम्यान सलमान खानला एक प्रश्न विचारण्यात आला, तुझ्यासाठी सर्वात प्रामाणिक समिक्षक कोण? तेव्हा सलमान उत्तरला माझ्यासाठी माझे सर्वात मोठे समिक्षक माझे वडील सलीम खान आहेत.
सलमान खानसला जेव्हा विचारण्यात आलं, 'भारत' पाहून तुझ्या वडीलांची नेमकी कशी प्रतिक्रीया होती हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तेव्हा सलमान म्हणाला," सिनेमा पाहताच वडील म्हणाले, 'पिक्चर बहुत हिट है!' आणि यातच सर्व काही आलं. सलमान पुढे सांगतो, ज्यांनी हा सिनेमा पाहून आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. प्रेक्षकांनीसुध्दा मला ही एक प्रकारची ईदीच दिली आहे.
'भारत' सिनेमाचं तुफान यश आणि प्रेक्षकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद व सोने पें सुहागा म्हणजे खुद्द वडिलांकडून मिळालेली दिलखुलास दाद यामुळे भाईजान सलमान खान सध्या भलताच खुश आहे.