अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मिडीयावर नुकतच त्याच्या करियमधील महत्त्वाच्या सिनेमाची आठवण करून दिली आहे. श्रेयसच्या इकबाल या हिंदी सिनेमाला नुकतीच तब्बल 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने श्रेयसने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ टाकलाय. ज्यात श्रेयसने त्याच्या आवाजातून या सिनेमाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओत श्रेयस म्हणतो की, "आज इकबाल रिलीज होऊन 15 वर्षे झाली. मी हे अजीबात बोलणार नाही की एवढी वर्षे कशी केली कुढे गेलीत कळालच नाही. कारण मला कळालं. चढउतार होता. हिट सिनेमे फ्लॉप सिनेमे. चांगले सिनेमे आणि वाईट सिनेमे. पण या सगळ्यात एक सिनेमा जो कायम तरुण राहीला तो म्हणजे इकबाल सिनेमा. धन्यवाद नागेश, सुभाषजी, राहुल आणि सगळ्या टीमचे धन्यवाद. माझ्या प्रेक्षकांचेही धन्यवाद ज्यांनी या सिनेमावर 15 वर्षे प्रेम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद इकबाल."
या सिनेमात श्रेयस तळपदेसोबतच अभिनेता नसीरुद्दीन शाह, श्वेता बासू हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या सिनेमासाठी श्रेयस तळपदेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा झी सिने क्रिटीक्स अवॉर्ड मिळाला होता. नागेश कुकूनर दिग्दर्शित या सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला होता.