By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा शेवटचा आठवडा, अक्षया देवधरने शेयर केली ही पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या मालिकेसह मालिकेती प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरलं. राणादा, अंजली बाई, लाडू, नंदिता वहिनी आणि इतर व्यक्तिरेखा चर्चेत राहिल्या. मात्र आता चार वर्षांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नंदिता वहिनी जिजा बनली तर राणादा राजा राजगोंडा बनला. प्रत्येक व्यतिरेखेचा हटके अंदाज प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. मात्र आता या मालिकेचा शेवटचा आठवडा आहे.  या  मालिकेत अंजली बाई, जिजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधरने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ही मालिका निरोप घेत असताना अक्षया या मालिकेच्या खास आठवणी शेयर करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अक्षया तिच्या पोस्टमध्ये लिहीते की, "‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होतेय. गेली चार वर्ष आणि १२५० हून अधिक भागांनंतर आता थांबायची वेळ जवळ आलीये. ह्या मालिकेशी संबंधीत प्रत्येकालाच ह्या मालिकेने खूप काही दिलंय! प्रत्येकासाठी ही मालिका स्पेशल आहे! आजपासून पुढचे सहा दिवस ह्या मालिकेच्या प्रवासातले काही क्षण शेअर करायचा प्रयत्न करेन! नक्की पहा, तुझ्यात जीव रंगलाचा शेवटचा आठवडा! सोम ते शनि सायं ६:३० वाजता, फक्त झी मराठीवर"

तेव्हा प्रेक्षकांची ही आवडती मालिका निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटच्या भागांमध्येही काहीतरी रंजक पाहायला मिळेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive