By  
on  

पाहा Video : "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेचा महाएपिसोड

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला आता वेगळं वळण मिळालं आहे. एकीकडे जयदीप आणि गौरी एक होताना दिसत आहेत. यात त्यांना आता देवी मायचा आशिर्वाद देखील मिळतोय.

प्रत्येकाने आपल्या गृहलक्ष्मीला पाठीवर घेऊन देवी मायच्या देवळापाशी जाण्याचं आव्हान जयदीपसमोर होतं. मग काय जयदीपनेही गौरीला पाठीवर घेऊन तो निघाला देवळाकडे जायला. जयदीप गौरीला घेऊन धावत तिथे पोहोचतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

यासाठी या मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. जयदीप गौरीला देवळापर्यंत कसा घेऊन जातो आणि त्यानंतर काय काय घडतं हे या खास भागात पाहायला मिळणार आहे. आता दोघांच्या सुखी संसाराला नवी सुरुवात होत असताना देवी मायचा आशिर्वाद दोघांना मिळताना दिसतोय. तेव्हा या मालिकेत पुढे आणखी काय पाहायला मिळेल हे येत्या भागांमधून समोर येईलच.

गौरीचं लहानपणीचं प्रेम म्हणजेच जयदीप आता तिला परत मिळाला आहे. मात्र या दोघांचा सुखी संसार असाच टीकून राहिल की पुन्हा कुणी त्यात विष कालवायचा प्रयत्न करेल यासाठी या मालिकेच्या पुढील भागांची वाट पाहावी लागेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive