By  
on  

पाहा Video : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये ट्विस्ट, जयदीप घेतोय गौरीला छळणाऱ्यांचा बदला

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जयदीप आणि गौरीच्या प्रेमात विष कालवणारे आणि या दोघांमध्ये येणाऱ्या सगळ्यांना आता जयदीप धडा शिकवताना दिसतोय. एकीकडे शालिनी वहिनी आणि इतरांनी मिळून गौरीचा छळ केला. मात्र आता जयदीप गप्प बसणार नाही. तर सगळ्यांचा बदला घेताना दिसणार आहे.

मात्र या सगळ्यात गौरी भावुक होताना दिसतेय. गौरी ढसाढसा रडताना दिसत आहे. जयदीप गौरीला शांत करायचा प्रयत्नही करतो. यावेळी जयदीप गौरीला सांगतो की, "आता तू रडायचं नाही, रडायची वेळ आता त्यांची". तेव्हा जयदीपमुळे कित्येकदा रडलेली गौरी जयदीपला ती त्याच्यामुळे रडल्याचही सांगते. शिवाय आता जयदीपचं तिला रडण्यापासून शांत करतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या सगळ्यात जयदीप आणि गौरी पुन्हा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतय. पुढे या मालिकेत आणखी काय पाहायला मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive