By  
on  

पाहा Video : गोंधळात पडलेल्या अभिषेकला आई अरुंधतीकडून मिळाला हा सल्ला

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर असल्याचं पाहायला मिळतय. सध्याचे काही भाग अभिषेक आणि त्याचं लग्न यागोष्टीभोवती फिरत आहेत. अभिषेकचं अनघावर प्रेम आहे पण बाबांमुळे तो अंकिताशी लग्न करण्याचा निर्णय घेण्याकडे वळतोय. मात्र या अभिषेक स्वत: गोंधळात असल्याचं पाहायला मिळतय.

लग्नाच्या बाबतीत असा कोणताच हलगर्जीपणा अभिषेकची आई अरुंधतीला नकोय. म्हणूनच अभिषेक या गोंधळातं न पडता त्याने नीट विचार करण्याचा सल्ला आई त्याला देत आहे. त्याच्या निर्णयावर आई, बाबा आणि अनघा यांचं आयुष्य अवलंबुन असल्याचही ती त्याला सांगते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आईच्या सांगण्यावरुन आता अभिषेक काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं ठरणार आहे. आई आणि बाबांमध्ये अभिषेक नेमकं कुणाचं ऐकतो हे लवकरच मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

कमी कालावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका आता वेगळ्या वळणावर असल्याचं पाहायला मिळतय. सुरुवातीला आपल्या पतीचा आदर करणारी अरुंधती आता सगळं सत्य समोर आल्यावर खंबीरपणे स्वत:साठी आणि परिवारासाठी उभी आहे. आपल्या मुलांना योग्य तो निर्णय घेण्याचे सल्ले देतानाही ती दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive