'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या वेगवेगळी वळणं पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आणि अनिरुद्धचा लवकरच घटस्फोट होणार आहे. मात्र त्याआधी बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. ज्याने दोघही एकत्र आले आहेत. यात इशाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, ज्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अरुंधती इशाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि ती आनंदी रहावी याकडे लक्ष देत आहे.
नुकतच संजनाचा एक्स पति शेखरने अरुंधतीची भेट घेतली आहे. संजनाचा आता अनिरुद्धच्या घरावर डोळा असल्याचं त्याने सांगीतलं. हे सांगताना त्याने अनिरुद्ध आणि संजना बद्दलचा रागही व्यक्त केला. मात्र या सगळ्यावर अरुंधतीने काहीही प्रतिक्रिया दिली आहे. उलट सध्या ती अप्रिय विषयांकडे दुर्लक्ष करत असल्याचं तिने शेखरला सांगीतलं. ती म्हणते की, "आम्ही सध्या हे अप्रिय विषय टाळतोय, समोर प्रश्न येईल तेव्हा बघायचं..."
इशाला आनंदी ठेवणं तर दुसरीकडे अभिषेकचं लग्न या सगळ्यात अनिरुद्ध आणि अरुंधती एकत्र आलेत. या सगळ्या गोष्टी त्यांना पुन्हा एकत्र आणू शकतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या सगळ्यात संजनाचा वेगळा प्लॅन दिसतोय. संजनाला अनिरुद्धच्या घरी यायचय. त्यासाठी ती पुढे काय नवा डाव रचेल हे मालिकेच्या पुढील भागांत समोर येईलच.