By  
on  

पाहा Video : अंकिताला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर "मी घरातून गेले म्हणजे सगळ्यांशी संबंध संपला नाही"

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. अभिषेकने अंकितासोबत अचानक लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला. आता अंकिता देशमुख कुटुंबासोबत राहतेय. तर दुसरीकडे संजनाही घरात रहायला आलीय. या सगळ्यात घरात प्रचंड वाद विवाद होताना दिसत आहेत. देशमुख कुटुंबाच्या घरचं वातावरणं वेगळं झालेलं पाहायला मिळतय.

या सगळ्यात अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधती हे घर सोडून जाणार आहे. याच गोष्टीचा उल्लेख अंकिता करते. मात्र घरातून गेल्यानंतर या घरातील माणसांशी संबंध संपला असं होणार नसल्याचं अरुंधती यावेळी अंकिताला सांगते.

अरुंधती म्हणते की, "मी या घरातून गेले म्हणजे माझा या सगळ्यांशी संबंध संपला असं होणार नाही." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अरुंधतीने घर सोडल्यानंतरही देशमुख कुटुंबासोबतचा तिचा संबंध कायम राहणार आहे. अरुंधती नसतानाही घरच्यांनाही कोणता त्रास होता कामा नये अशीही ताकीद ती अंकिताला देते.

 सध्या अंकिता आणि संजना एकत्र आल्यामुळेही देशमुखांच्या घरात बरेच वाद होताना दिसत आहे. एकिकडे अनिरुद्धला मिळवण्यासाठी संजनाची धडपट सुरु आहे तर दुसरीकडे अंकिता अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यात अरुंधतीची प्रकृतीही बिघडलेली आहे. तेव्हा घटस्फोटानंतर अरुंधती घर सोडून जाणार का ? अंकिता आणि संजना आता कोणती युक्ति रचणार हे पुढील भागांमधून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive