By  
on  

पाहा Video : अरुंधतीने हात जोडून मागितली अनघाची माफी, मालिकेत पुन्हा अनघाची एन्ट्री

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. देशमुख कुटुंब नुकतीच मुंबईत परतली आहेत. मात्र त्याआधी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे निवांत क्षण घालवण्यासाठी गेलेल्या रिसॉर्टमध्ये चक्क साहील दिसल्याने ईशा घाबरली होती. मात्र साहीलने सगळ्यांसमोर माफी मागून त्याची चूक कबुल केल्याने देशमुख कुटुंबाने त्याला माफ केल्याचं चित्र पाहायला मिळालं. ईशा आणि साहीलचे संबंधही आता चांगले झाले आहेत. मात्र अभिषेक आणि अंकिताचं लग्नानंतरही विचित्र झालय. अंकिताने आत्महत्या केल्याचं खोटं नाटक करत अभिषेकसोबत लग्न केलंय. ज्यामुळे अनघासोबतचा त्याचा साखरपुडा मोडला. 

मुंबईत परत आल्यावर अरुंधतीला अनघाची पुन्हा आठवण झाली. अनघा सोबत घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जात नव्हत. न राहवता अरुंधतीने आता अनघाला फोन केलाय. याशिवाय तिला भेटण्यासाठीही बोलावलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

जेव्हा अनघा अरुंधतीला भेटते तेव्हा ती पूर्वीसारखी बोलत नाही. अरुंधती आणि ती दोघही भावुक झालेले दिसतात. मात्र या सगळ्यात अरुंधती पुढाकार घेऊन बोलू लागते आणि अनघाची हात जोडून माफी मागते. तेव्हा अनघा आता पुन्हा अरुंधतीसोबत मैत्रीचं नातं ठेवेल का ? अनघा अभिषेकला माफ करू शकेल का ? घडलेला प्रसंग विसरू शकेल का हे पुढील भागांमधून समोर येईलच. 

एकीकडे अभिषेकला अंकिताच्या खोटेपणाचा संशय आलाय. मात्र अद्याप त्याच्या हाती पुरावे लागले नाहीत. यश आणि शेखर काकांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचा आणि अंकिताचं सत्य शोधून काढण्याचा निर्णय आता अभिषेकने घेतलाय. मात्र यात पुढे काय होतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive