By  
on  

सलमान खान आणि कतरिना करणार 'भारत'मध्ये लग्न

बॉलिवूड दबंग सलमान खानचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. यात पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही सिझलिंग जोडी एकत्र झळकतेय. टायगर जिंदा है सिनेमात दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. आता त्यानंतर भारतनिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना ही संधी मिळतेय.

'भारत' सिनेमाच्या सूत्रांनी दिलेल्या एका माहितीनुसार सलमान आणि कतरिनाच्या लग्नाचा एक सिक्वेन्स सीन शूट करण्यात येणार आहे. सिनेमात अनेक गाणी आहेत, पण एक खास गाण आहे जे वेडींग सॉंग आहे. यात सलमान आणि कतरिनाचा खास अंदाज पाहायला मिळणार असून ते प्रसिध्द कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केलं आहे. यासाठी संपूर्ण सेट फुलांनी सजवल्याचं कतरिनाच्या या ट्विटमध्ये दिसंतय.

https://twitter.com/KatrinaKaifFB/status/1090985544153288705

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'भारत' सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive