By  
on  

पाहा Video : अरुंधतीने तात्यांसमोर आणलं अनिरुद्धचं सत्य

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दचं सत्य हळूहळू सगळ्यांना कळतय. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने घरी तात्यांचं आगमन झालय. अनिरुद्धचं संजनासोबतचं नातं, घर सोडून जाणं या सगळ्या गोष्टी अद्याप तात्यांना माहिती नव्हत्या. त्यामुळे सारं काही आलबेल असल्याचं घरची मंडळी तात्यांसमोर वागत होते.

दिवाळीच्या निमित्ताने पाडव्याला जेव्हा अनिरुद्धला ओवाळण्याची वेळ अरुंधतीवर येते तेव्हा मात्र अरुंधती रितीचं पावित्र्य जपण्यासाठी सगळं सत्य तात्यांसमोर आणते. अनिरुद्धविषयीच्या सगळ्या गोष्टी यावेळी तात्यांसमोर येतात. अनिरुद्धचे वडिलदेखील तात्यांसमोर सगळ्या गोष्टी आणतात. हे सगळं तात्यांना कळल्यानंतर इतर सगळ्यांप्रमाणे तात्यादेखील अरुंधतीच्या बाजुने उभे राहतात. हा सगळा प्रकार पाहून अनिरुद्ध आणखी चिडतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मात्र या सगळ्यात अनिरुद्धला संजना मिळाली असली तरी त्याच्या परिवाराला गमावून बसलेला पाहायला मिळतोय. यापुढे या मालिकेत काय होतय ? अनिरुद्धला त्याची चूक लक्षात येईल का ? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

Recommended

PeepingMoon Exclusive