By  
on  

'आई कुठे काय करते' मध्ये अनिरुद्धने संजनाच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे देशमुख कुटुंब शहरापासून लांब गावाकडे राहायला आले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. शिवाय अनिरुद्ध आणि अरुंधती यानिमित्ताने एकत्र पाहायला मिळत आहेत. या गोष्टीची माहिती अनिरुद्धने संजनाला दिली नाही. पण संजनाला ही गोष्ट गौरीकडून समजते. 

आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजना सुद्धा या सगळ्यांसोबत पाहायला मिळतेय. संजना आता अनिरुद्धच्या कुटुंबासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. पण ते शक्य होत नाहीय. अनिरुद्धच्या कुटुंबाच्या मनात संजना तिचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. मात्र अनिरुद्धचं कुटुंब काही केल्या संजनाचा स्विकार करत नाही. यातच संजनाला आणखी मोठा धक्का बसतो. जेव्हा अनिरुद्ध संजनाला लग्नासाठी नकार देतो. अनिरुद्धला संजनासोबत लग्न करायचं नाही ही गोष्ट जेव्हा संजना अनिरुद्धच्या तोंडून ऐकते तेव्हा संजनाला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात अनिरुद्धची मुलगी इशाही तिथे येते. संजनाचा स्विकार ती कधीच करणार नसल्याचं इशा यावेळी म्हणते आणि संजना इशाच्या अंगावर रागाने धावून जाते. हे सगळं होत असताना अरुंधती तिथे पोहोचते आणि संजनाला तिथून निघून जायला सांगते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आता या सगळ्यात संजना कोणतं पाऊल उचलेलं ? अचानक संजनाचा द्वेष करणारा अनिरुद्ध आता कोणता निर्णय घेईल ? संजनाला सोडून अनिरुद्ध आता अरुंधती आणि कुटंबासोबत राहील का ? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळतील. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive