By  
on  

पाहा Video : अरुंधतीने अनिरुद्धकडे व्यक्त केली मनातली खंत

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या विविध गोष्टी घडत आहेत. एकामागोमाग एक विचित्र प्रसंग घडल्यानंतर देशमुख कुटुंबात एक वेगळच वातावरण निर्माण झालय. अभिषेकला रुग्णांच्या नातेवाईकांची मारहाण, इशाचा आत्महत्येचा प्रयत्न, संजनाचं पुन्हा घरात येणं आणि आता अभिषेकचं लग्न. अनघासोबतच्या साखरपुड्यातून अंकिताच्या आत्महत्येच्या बातमीने अभिषेक तिथून निघून गेला. जेव्हा तो आला ते थेट अंकितासोबत लग्न करूनच त्याने घरात प्रवेश केला. हे पाहुन सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अनघा यातून पार खचून गेली आणि तिथून निघून गेली. 

या सगळ्या घडनांचा अरुंधतीला प्रचंड त्रास झाल्याचं दिसतय. वर्षाभरात इतक्या गोष्टी झाल्या की दहा वर्षा वृद्ध झाल्यासारखं अरुंधतीला वाटू लागलय. सतत घडणाऱ्या विविध घटनांमुळे अरुंधतीला वेगळाच मनस्ताप झाल्याचं तिच्या बोलण्यावरून दिसतय. ती बोलते की, "मुलांची काळजी काय मिटत नाही आणि सगळ्या लढाया मी एकटीच लढतेय असं वाटायला लागलंय" पण या घटनांमध्ये अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळतय.म्हणूनच की काय मनातली खंत अरुंधती आता अनिरुद्धकडे व्यक्त करतेय. अनिरुद्धही तिला धीर देतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

एकीकडे संजनाकडे आकर्षित होणारा अनिरुद्ध आता पुन्हा अरुंधती आणि त्याच्या कुटंबाकडे वळल्याचं पाहायला मिळतय. अरुंधतीशी घटस्फोट घेऊन तो संजनासोबत कायम राहणार होता. मात्र आता चित्र बदललय. तेव्हा पुढे अनिरुद्ध कोणता निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive