By  
on  

अंजीसमोर येणार का अवनी-वैभवच्या नात्याचं सत्य ?

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत सध्या नवं वळण पाहायला मिळतय. अंजीच्या अपघातानंतर तिचा स्मृतीभंश झाला आणि संपूर्ण परिवाराला धक्का बसला. यातच अंजी तिचा पति पश्यालाही विसरली. मात्र संपूर्ण कुटुंबाने अंजीला सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी विविध गोष्टी केल्या. 

एकीकडे अंजीला वैभव तिचा पति वाटतोय ज्यामुळे ती वैभवला मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालण्यासाठी सांगते. त्याचवेळी अवनी तिथे येऊन पोहोचते आणि अंजीला थांबवते. या सगळ्यात अंजीला अवनी आणि वैभवच्या नात्याविषयी कळेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

सुख - दु:खात एकत्र असणार आणि एकमेकांसोबत उभं राहणारं मोरे कुटुंब याहीवेळी अंजीची स्मृती परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल हे मालिकेतून समोर येईलच. मात्रअंजीला लवकरच सगळ्या गोष्टी आठवतील का ? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता विविध वळणावर काही हटके ट्विस्ट घेऊन ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive