By  
on  

पाहा Video : अनिरुद्धच्या अपघातानंतर या गोष्टीसाठी अरुंधतीने मागितली माफी

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. अनिरुद्धच्या अपघातानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. या अचानक झालेल्या अपघाताने अरुंधतीलाही धक्का बसला आहे. मात्र यासाठी स्वत: जबाबदार असल्यास त्यासाठी ती माफीही मागते. मात्र हा अपघात झाल्याचा दोष ती स्वत:ला देतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अरुंधतीने सगळ्यांसमोर अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आणि म्हणूनच की काय अनिरुद्धचा अपघात झाला असल्याचं तिला वाटतय. त्यासाठी ती अनिरुद्धची माफीही मागते. नंतर तिनं तसं का केलं याचं कारणही सांगते. अरुंधतीला अनिरुद्धसोबतच्या संघर्षाचा शेवट करायचा होता. अरुंधतीला हा संघर्ष मिटवायचा होता त्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. 

एकीकडे संजनासाठी अनिरुद्धने अरुंधती आणि परिवारासाची पर्वा न करता घर सोडून संजनासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय चूकल्याची जाणीव त्याला होत असल्याचं आता पाहायला मिळतय. आता अनिरुद्धला त्याची चूक समजत असताना पुन्हा अरुंधती आणि तो एकत्र येणार का ? अरुंधती पुन्हा अनिरुद्धला पतिचा दर्जा देऊ शकेल का ? हे या मालिकेत पुढे पाहायला मिळेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive